0

बडबड गीत

"ये रे ये रे पावसा" किंवा "झुक झुक झुक आगिन गाडी" अशी कितीतरी दुर्मिळ बडबड गीतं ऐकून बराच काळ झाला. ते प्राथमिक शाळेतले दिवस! आहा! आजूनही ते क्षण डोळ्यासमोर आहेत.  बघता बघता १२-१५ वर्ष उलटून गेली पण तरिही सगळं अगदी काल घडल्यासारखे स्पष्ट आठवतय. ते शाळेतले गुरूजी, त्यांचा तो प्रेमळ स्वभाव, अगदी स्वतःची मुलं असल्यासारखे केलेले प्रेम आठवून खरच कंठ दाटून येतो! आजही  प्राथमिक शाळेतले शिक्षक दिसले की नकळतच चेहर्‍यावर स्मीतहास्य येते. खरच ते क्षण "लय भारी" होते. पण खरच ते दिवस आणि आज जे काही अनुभवायला मिळतय यात किती फरक पडलाय नाही?मी एका छोट्या गावात राहतो. "खेड्याकडे चला" चे उत्तम उदाहरण म्हणजे माझे गाव. काहिही सुविधा नसलेले माझे गाव आज एका "शहरा" इतके प्रगत झाले आहे पण त्यातली पोकळी आत्ता थोडी थोडी बाहेर यायला लागली आहे.

माझ्या गल्लीत जवळपास पाच ते दहा वयोगटातली जवळ जवळ ८-१० बारकी आहेत. त्यांना "वानरसेना" म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सध्या नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दिवसभर त्यांचा चिवचिवाट सुरू असतो. एकदा शांत बसून त्यांची बडबड ऐकली तर खरच खुप मजा येते. त्यांचे ते बोबडे बोल ऐकून नकळत आपणही मनात बोबडे बोलायला लागतो :).

परवा असाच पुस्तक वाचत बसलो होतो. नेहमीप्रमाणे सगळी वानरसेना गल्लीभर चिवचिवाट करत सुटली होती. मी पुस्तक ठेवलं आणि हळूच खिडकीतुन त्यांची मजा पाहायला लागलो. साधारण एक पंधरा वीस मिनिटांनी त्यांचा सेनाप्रमुख मोठ्याने ओरडला "ए पकला-पकली बास झाली आता. आता आपन शाला-शाला खेलू". म्हटलं चला आता फुल टू करमणूक होणार. त्यांचं ते "शाला-शाला" सुरू झालं. अ-ब-क-ड चा तास संपला आणि "बडबडगीतांचा" तास सुरू झाला.

पहिलं बडबडगीत ऐकताच मी हदरलो. आपेक्षेनुसार ते "झुक-झुक-झुक आगिनगाडी" किंवा "येरे येरे पावसा" किंवा फारफार तर "चांदोमामा चांदोमामा लपलास का" वगैरे एखादे असेल पण ही पोरं मोठमोठ्याने "शीला शीला की जवानी" म्हणायला लागली.दोन मिनिट मी सुन्नच झालो. त्यानंतरच त्यांच गाणं होतं "मुन्नी बदनाम हुई, दालिंग तेले लिये".  अरे हा काय प्रकार आहे? ही कसली बडबड गीतं??माझ्या मनाची चक्र वेगानं फिरू लागली....

ज्यांना साधा शेंबुड पुसता येत नाही अशी ही यंग जनरेशन खरोखरच कसले संकेत देत आहे? खरच यात त्यांचा काही दोष आहे? नाही. दोष आपला आहे. म्हणतात ना जे पेराल तेच उगवते! मग त्यांचा दोष तो कोणता? मध्यंतरी काही कामाकरिता माझ्या जुन्या शाळेत जाऊन आलो. अगदी मोजके जुने शिक्षक राहिलेले. बाकी सगळा स्टाफ नवा, २५-३० वयोगटातला. स्टाफरूममध्ये डोकावलं तर निम्मे अर्धे मोबाईलमध्ये गुंग, एकिकडे वर्ग चालू तर दुसरीकडे यांचे मोबाईल. आज सर्रास मोबाईल फोन वापरात आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सोबत मोबाईल ही देखिल मुलभुत गरज बनली आहे पण म्हणून काय तो या विद्येच्या मंदिरातही गरजेचा आहे? सहज माझ्या एका जुन्या शिक्षकांशी बोलत असताना "शीला,शीला की जवानी" गाणं सुरू झालं. बोलता बोलताच सरांच एकदम लक्ष विचलीत झालं आणि मला त्यांनी मान डोलावून डोकावायला सांगितल. मी सहज काचेतुन डोकावलं तर ती एका मास्तरांच्या मोबाईलची रिंगटोन होती.

आत्ता त्या घटनेची लिंक लागली . जर विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे गुरुजीच केंदाळात वावरत आहेत तर मग त्यात स्वच्छता, निर्मळता कशी राहिल? जणू एखाद्या वादळाच्या वेगाने ही नवी जनरेशन गोष्टी आत्मसात करत असताना त्यांना जर योग्य दिशा दाखवणारेच दिशाभूल होण्यास कारणीभूत असतिल तर खरच ही नींदनिय बाब आहे. केवळ गुरुजीच नव्हे, तर करिअरच्या मागे लागलेले पालकही याला तितकेच जबाबदार आहेत. हा बडबडगीतांचा प्रकार केवळ एक ट्रेलर म्हणाल तरी हरकत नाही.

"क्या हम गलफ्रेंड-बॉयफ्रेंड है" ही मॅकडोनलची जाहिरात कित्येकांना भावली. फेसबुक,ऑर्कुटवर जो-तो उठून "wow! so cute" किंवा "how nice!!" सारख्या उपमा देत ही जाहिरात शेअर करत होता पण जर खरच विचार केलात कधी? गलफ्रेंड, बॉयफ्रेंड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कधी कळाले ते आठवू शकाल? फार फार तर ५-७ वर्षापुर्वीपासून हे शब्द so called high सोसायटीतून आज खेड्या-खेड्यापर्यंत पोहोचले आहेत. आणि आपण या अशा संस्कृतीची जाहिरात करून नेमकं आपल्या नव्या जनरेशनला काय शिकवू पाहतोय? यावरच एक किस्सा सांगतो. मध्यंतरी एका लग्नानिमित्त सर्व लोक एकत्र आलो होतो. बरेच पाहुणेमंडळी बर्‍याच दिवसांनी एकत्र भेटले होते त्यामुळे गप्पांना उत आला होता. बोलता बोलता बरेच विषय निघत गेले. त्यात हा विषय आला. एक बाई आगदी अभिमानाने म्हणाल्या,
"अहो ऐका हा किस्सा. आमच्या विकीचा (मुलाचे नाव महेश.पण तरिही विकी. का कोणास ठाऊक!) फक्त ८ वर्षाचा आहे. परवा काय म्हणाला माहितिये? त्याच्या बाबाला म्हणाला, ’ए बाबा. आपण आणखी एक घर आणि गाडी घेउयात की’, मग आम्ही आश्चर्याने विचारले, ’का रे? एकदम का तुला सुचलं?’ तर म्हणतो कसा , ’काही दिवसांनी माझी गर्लफ्रेंड येईल. मग आम्ही दुसरीकडे राहायला जाणार. मग आम्ही तुम्हाला हॉलिडेज मध्ये भेटायला यायला गाडी पाहिजेकी’. हा हा हा! ऐकलतं म्हणतो कसा! कित्ती गोड बाळ माझं"

???गोड???नेमकं यात यांना त्याचा अभिमान वाटण्यासारखे दिसले तरी काय?? आजून चड्डी घालता येत नसलेलं शेंबड मुल आत्तापासूनच; वयाच्या ८व्या वर्षा पासूनच "वेगळ राहणार, गर्लफ्रेंड फिरवणार, कधीतरी हॉलिडेजनाच भेटायला येणार" म्हणतोय आणि हे लोक ते अभिमानाने चारचौघांना सांगताहेत??आणि ते ही त्याच्या समोरच??

खरच यावर प्रत्येक पालकाने विचार करायला हवा. मला अत्तापासूनच भिती वाटायला लागलिये की उद्या माझा मुलगा/मुलगी कोणालाही हाताला धरून घरी घेऊन येईल आणि म्हणेल "हे डॅड! लूक! ही इज माय गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड. मी याच्याशी लग्न करणारे. तुमची परवानगी असेल तर नाईस, नसेल तर आम्ही पळून जायचं ठरवल आहे!" आत्ता हे मजेशीर वाटतयं पण प्रत्यक्षात कधी घराघरांत उतरेल काही सांगता येत नाही.

तेवढ्यात "ससा ले ससा,कापूस जसा" गाणं ऐकू आलं आणि भानावर आलो. कदाचित चुकल्या-चुकल्यासारखं काहीसं ऐकू आल्याने तंद्री भंग झाली असेल ! :) पण असो, काही का होईना आमच्यावेळच निदान हे तरी बडबडगीत या वानरसेनेच्या तोंडून ऐकायला मिळालं! पण तरिही जे काही या दरम्यान मनात येऊन गेलं ते बैचेन करण्यालायक नक्कीच होते.

-अद्वैत
माझा हा लेख या आधी येथे प्रकाशित:  http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=29&t=525
0

काय कस काय ?





Mandar H. Sawant...............
0

कशाला ??

असं सोडून जायचंच होतं तर 
माझ्या आयुष्यात आलासच कशाला??
असं सुंदर स्वप्न दाखवायचं होतं 
तर स्वप्नं दाखवलस तरी कशाला??
असा हात हातात धरून कायम सोडूनच दयायचाच होता
तर हात हातात घेतलासच तरी कशाला ???
तुला दिलेले गुलाबाचे फुल पायाखाली तुडवायचेच  होते 
तर माझ्या कडून त्याचा स्वीकार केलासच तरी कशाला ??
तुझं प्रेम नव्हतंच माझ्या वर तर प्रेमाच्या चार भाषा 
शिकवल्यास तरी कशाला??
असं शेवट पर्यंत डोळ्यात अश्रू  दयायचेच होते तर
आनंदी क्षण दाखवलेस तरी कशाला ????
आयुष्य भर साथ देईन तुला असं वचन देऊन परत माघार 
घेतलीसच कशाला ??
माझं मन असं दुखवायचंच होतं तर जुळवलस तरी कशाला ??
तू मला विसरून गेलास मग मी तुला आठवू तरी कशाला ???
















                                                                                             प्रिती रोकडे .................
2

ऐसा बालगंधर्व पुन्हा न होणे !!!

          आपल्या देशात प्रत्येक क्षेत्राच्या प्रगती मध्ये मराठी माणसाचे योगदान खूप ,मोलाचे आहेत.स्वातंत्र्य लढया पासून, खेळ, सामाजिक, राजकीय तसेच कलाक्षेत्रात; कला क्षेत्रातून आठवल.... मराठी रंग भूमी वरील  अजरामर नाव म्हणजेच बालगंधर्व आपल्या गायन व अभिनयाने मराठी रंगभूमी ला जगात एक वेगळे स्थान निर्माण करून देणाऱ्या अश्या प्रतिभावान कलावंताची १२० वी जयंती २६ जून या दिवशी आहे .
             नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यात नागठाणे या गावी झाला. वयाच्या १० व्या वर्षी त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व हि उपाधी दिली. हे बालगंधर्व विशेषण नारायणराव राजहंस यांना आयुष्यभर चिकटले, नव्हे त्यांचे मूळ नाव मागे पडून केवळ बालगंधर्व एवढेच त्यांचे नाव प्रचलित झाले.
            बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अपवादानेच अभिनय करीत असतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत.

                  बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत १९०५ मध्ये झाली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी १९१३ मध्ये बालगंधर्वांनी गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली, अन मग मराठी रंगमंचावर अवतरले ते नाट्यकलेचे सुवर्णयुग. संगीतसौभद्र, शाकुंतल, संशयकल्लोळ, मानापमान, विद्याहरण, एकच प्याला, स्वयंवर अश्या अनेक संगीत नाटका मध्ये बालगंधर्वांनी आपल्या संगीताची आणि अभिनयाची सर्वदूर पसरवली. त्यांच्या शाकुंतल या नाटकात शकुंतला हे पात्र आणि मानापमान या नाटकातील भामिनी च्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. नाट्य संगीत ,अभिनय, नैपथ्य या सर्व गोष्टीत ते पारंगत होते.  स्रियांच्या वेषातून पुरुष अशा नजाकतीने वावरायचा की, सौंदर्यवती महिलाही त्यांचे अनुकरण करायच्या. शब्दाचा घाट, त्याचा लाडिकपणा, त्याची अचूक फेक यातून बालगंधर्वांच्या दर्शनाएवढेच बोलणेही प्रसन्न व्हायचे. पुढे बोल पटांचा जमाना चालू झाल्यावर बालगंधर्वांनी प्रभात फिल्म कंपनीसाठी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.

                     त्यांच्या कलाक्षेत्रातील अतुल्य योगदान पाहून भारत सरकारने त्यांना १९५५ साली राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केलं. तसेच १९६४ साली पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांनी २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले. अश्या मनस्वी कलावंताने १५ जुलै १९६७ साली जीवनाच्या रंगमंचावरून कायमची  निवृत्ती घेतली.

अशा या सव्यसाची कलावंताला कोटी कोटी प्रणाम अन् मनाचा मुजरा

संकल्पना व संकलन : निवेदिता पाटील 
शब्दांकन : राजेंद्र सबने
माहिती स्त्रोत व छायाचित्र : आंतरजालावरून साभार 



3

जाहीर माफी ...

जाहीर माफी ...

अनवधानाने आठवणीतली कविता माझी म्हणून पोस्ट केली..  वहीत पाहून खात्री करून घ्यायला हवी होती.
सूचनेबद्दल धन्यवाद कल्पेश ...

आता हि खरोखर माझीच ..
अन ती हि चंगो च्याच कवितेच्या पुस्तकावरची ...












"मी माझा"

तू तुझा आहेस...ठीक आहे
तू माझा असावास हा आग्रह नाही ...
कारण तुझे असणेच इतके छान आहे..
की तिथे तुझा माझा हा विग्रह नाही ...

- भक्ती आजगावकर (इथे हे नक्की देऊ शकते )
पुन्हा एकदा माफी .. :)
0

पहिला मराठी उद्योजक

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी गुर्लहोसूर या गावी झाला.धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिटयूटमध्ये कला शिक्षक आणि बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १८९७ मध्ये मुंबई सोडून ते बेळगावला आले. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. १९१० साली औंध संस्थानाकडून उत्पादनासाठी सवलती मिळाल्यामुळे कुंडल येथे निर्जन आणि निर्जल अशा माळरानावर किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने लक्ष्मणरावांनी कारखाना उभारला आणि किर्लोस्कर वाडीच्या वसाहती प्रारंभ केला. शेतीसाठी लागणारे लोखंडी नांगर, मोटार, रहाट, चरक इत्यादी वस्तूंचे उत्पादन त्या कारखान्यात सुरु झाले. १९२० सालापासून भांडवल वाढविण्यासाठी कारखान्याचे त्यांनी मर्यादित कंपनीत रुपांतर केले. या कंपनीतर्फे आणखी विविध प्रकारचे उत्पादन होऊ लागले. त्यात हातपंप, लहान मोठे यांत्रिक पंप, लेथ मशीन्स तसेच लोखंडी फर्निचर इत्यादी. लक्ष्मणराव हे काही वर्षे औंध संस्थानाचे दिवाण होते. लक्ष्मणरावांनी औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसतांनाही किर्लोस्कर उद्योग समूह त्यांन अतिशय परीश्रमाने उभा केला. अशा किर्लोस्करांवर २० जुन १९८९  साली भारत सरकार ने पोस्टाचे तिकीट हि काढले.


किर्लोस्करांवर २० जुन १९८९  साली भारत सरकार ने पोस्टाचे तिकीट 
हे तिकीट प्रसिद्ध करताना देलेली माहिती खाली देत आहे. 
The Kirloskar story began in 1888 when Laxmanrao Kirloskar set up a small bicycle repair shop at Belgaum. Laxanrao and his brothers set up a model industrial colony called 'Kirloskravadi'. Their new company 'Kirloskar Brothers Limited' was the parent of all the 26 companies that flourish under the Kirloskar banner today. The end of World War II brought a tremendous upsurge of industrial activity under Laxmanrao's eldest son 'S.L.'. Kirloskar Electric Company Limited at Bangalore, and Kirloskar Oil Engines Limited at Pune were established in 1946, the latter was in collaboration with U.K based Associated British Oil Engines Export Ltd., the first instance of an Indo-Foreign collaboration. Next came Kirloskar Pneumatic Company Limited (1958) and Kirloskar Cummins Limited (1962) both at Pune. The latter won a citation from Lloyd's Register of Shipping. Later the Kirloskar diversified into industrial consultancy and five star hotels among other activities. Today the Group's annual sales exceed Rs. 700 crores. It has been a long march from a small shed to 26 powerful units, from a work force of four to over 20,000 employees- the Kirloskars have kept pace with India's march to freedom, to self-sufficiency, to export around the globe, and contributing to the country's core industries such as defence, power generation, oil and gas, agriculture, steel, coal and mining, railways and transportation. The Kirloskars describe themselves as 'businessmen engaged in winning freedom and prosperity for our country through our chosen method - engineering excellence'.




किर्लोस्करांच्या जन्मदिनी त्यांना शतश: नमन 


शब्दांकन - निवेदिता पाटील 

बरीचशी माहिती आणि छायचित्र आंतरजालावरून साभार 



0

कहानी चंद्रकांता कि !!!!

आज सकाळी TV वर चॅनेल सर्फ करत असताना अचानक सहारा वन वर कार्यक्रम बघितला कहानी चंद्रकांता कि !!!! आणि मनात विचार आला आयला चंद्रकांता परत चालू झाली?? १९९४ ते १९९६ च्या दरम्यात दूरदर्शन वर चालणारी दर रविवारी लागणारी सिरीयल मी आणि माझा भाऊ न चुकता बघणारे. कालांतराने हि सिरीयल दूरदर्शन वरून बंद होऊन सोनी तव वर आली . आपण हि सहारा वन वर चालू झालेली हि नवीन चंद्रकांता डेली सोप सारखी कहानी पुढे नेलेली निघाली. आता मात्र हद्द झाली म्हणत मी आपला चॅनेल बदलला. शेवटी काहीच नाही म्हणून गाणी ऐकत बसली. पण मन मात्र मागच्या आठवणींमध्ये अडकून बसला ह्या चंद्रकांता मधला सर्वात लक्षात राहिलेलं पात्र म्हणजे अखिलेंद्र मिश्र यांनी साकारलेला "क्रूर सिंग" आणि त्याची ती "याक्कू" म्हणण्याची पद्दत. ते आठवण आली आणि अचानक कंटाळेल्या चेहऱ्यावर हसू फुटलं. त्यानंतर लगेच आठवला तो भाऊ आणि त्याच्या उद्योगामुळे त्याला आम्ही क्रूर सिंग नाव ठेवला होता. 

                                                     क्रूर सिंग त्याच्या दोन चेल्यांसह

झालं असा होता हि भावाच्या केसात झाला होता कोंडा आणि ह्या पट्ठ्याला वाचनाची फार आवड. त्याचमुळे त्याच्या वाचनात आलं होतं कि केसांना लिंब लावलं कि कोंडा कमी होतो. मग काय हि स्वारी पोहोचली आई कडे म्हणायला लागली मी केसांना लिंब लावतो. आई बिच्चारी कामात होती म्हणाली आपण नंतर लावू मी आत्ता कामात आहे. थोड्यावेळाने आईचे काम आटोपले तसे भावाने परत आठवण करून दिली केसांना लिंब लावून दे म्हणून. मी बघितलं या मायलेकांचा केसांना लिंब लावायचा कार्यक्रम चालू होतोय आपण आपला पळाव म्हणून मी वरच्या मजल्यावर गेली थोड्या वेळाने दादा म्हणेज आमचे वडील आले. त्यांचा आवाज ऐकून मी खाली आली आणि भावाला बघून जोरात हसू आला ते हसू आवारत मी विचारलं हा क्रूर सिंग का झाला?? कारण लिंब लावल्यामुळे त्याचे केस उभे राहिले होते. हे ऐकून तो आरशात बघायला गेला आणि आम्ही सगळे हसू लागलो. तेव्हापासून कितीतरी महिने त्यांना तेच नाव पडल होतं. आजही आठवलं कि हसू आवरत नाही. आता ती चंद्रकांता हि नाही आणि तशी वेळ हि येत नाही फारशी. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असाच मनाच्या कुपीत असलेला आठवणींचा अत्तर जीवन सुखी करत असतं.
6

Marathi Buzz Mandal. Slideshow

Marathi Buzz Mandal. Slideshow: "TripAdvisor™ TripWow ★ Marathi Buzz Mandal. Slideshow ★ to Mumbai (Bombay). Stunning free travel slideshows on TripAdvisor"
3

"अहो बाबा"

        आजपर्यंत  शतकानु शतके आईच्या कितीतरी गोष्टी, कविता, गाणी, चित्रपट एकले वाचले. पण बाबांविषयी कमीच बोलले गेले.  पिता म्हणजे जन्मदाता, त्यांच्या असण्याने आपण पूर्ण आहोत. आपली आई, कुटुंब, घर अर्थातच अधुरे आहेत. आईचे उपकार न विसरण्यारखे पण बाबांचे उपकार न टाळण्यासारखे आहेत हो न! कित्ती थोरवी वाचावी तेव्हढी कमीच आहे त्यांची, आज आपण कित्तेक वर्षाने दमलेल्या बाबाची कहाणी ऐकून भरलेल्या डोळ्यांनी ते दिवस आठवतो, आपल्या आपल्या वडिलांना आठविण्याचे कारण पण वेगळे वेगळेच कि कधी त्यांनी केलेल्या उपकारांनी तर कधी दिलेल्या नकारात्मक निर्णयाने ते विस्मरणात आहेतच. आई रसाळ आंब्याचे रूप तर वडील काटेरी फणसाच्या आतल्या गोड गरयासारखे, बाहेरून काटेरी स्वभाव पण आतून तिळ-तिळाने तुटणारे त्यांचे प्रेमळ मन आठवावे तितकेच कमी, आज आपण बरीच प्रगती केली आहे. अहो बाबांचा अरे बाबा सुद्धा झालाय. आपली वडीलांसाठी असलेली आदरणीय हाक आज जरी बदलली असली तरी त्यांच्या विषयीचा आदर मात्र नाही बदललाय. आईला आपली प्रेमाची हाक "अग आई!" म्हणून असते, मग बाबांना "अहो बाबा" बोलून दूर का करायचं? आदर देण्यासाठी संबोधन एकेरी नसावे असे काही नाही आणि मला तर ते पटले. असो ते आपल्या आपल्यावर अवलंबून आहे. पिता-मुलांचे नातेच काही और असते.

                            
                वडील कित्ती महत्वाचे हे काय बोलण्याचा विषय नाही. पण ते नसते तर आपण दुनिया बघितली नसती त्यांचे अस्तित्वच आपले विश्व देवाने प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली पण त्याला प्रत्येकाचे चोचले नाही पुरविता येत म्हणून त्याने प्रत्येकाला वडील दिले असं मला वाटत. त्या मात्या - पित्याचे उपकार थोरच आहेत आणि एक दिवस पाळून काय साध्य होणार. प्रत्येक दिवस त्यांच्या नावावर असायला पाहिजे. लहानपणा पासून मोठ्ठ होईपर्यंत त्याचं योगदान खूप महत्वाच असते. आपल्या लहानग्याला मोठ्ठ केल पाहिजे, शिकवलं पाहिजे, सर्व दुखांपासून लांब आणि जगातील सर्व सुख मिळाली पाहिजेत म्हणून ते कित्ती तरी काटकसर करतात. शेवटी त्याचंपण आयुष्य आहेच कि पण तरीही ते इतकी मोठ्ठी काटकसर करतात आणि आपल्या पिल्लांना वाढवतात. अभ्यास नाही केलं म्हणून रागविणे, मारणे, ओरडणे या गोष्टी नसत्या तर आपल्याला वळण कसं लागल असत. आपले पाकिटाचे पोट भरणे, वेळीस मोठ्ठ्या मोठ्ठ्या त्रासातून बाहेर काढणे हे वडीलच करतात कि, आई जीवनाचा आधार असतो पण बाप जीवन जगण्याचा निर्धार असतो. कारण पुराणात आणि वेदात, श्लोकांत वाचेलच आहे आपण माता-पित्यांची थोरवी.... त्यांच्या शिवाय जसे आयुष्य पूर्ण नाही होत. थोड खरचटलं कि पटकन बोलतो "आई ग!" पण मोठ्या अपघातातून वाचलो कि तोंडातून निघत "बाप रे !". 
                              दररोज च्या जेवांची सोय करणारी आई असली तरी आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था  करणारा बापच असतो. बाबा प्रत्येकाकडे असतात. त्याच्यातला मित्र मात्र कमवावा लागतो. मग त्यांच्यातला मित्र मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नं!! 

Happy Fathers Day!!!


शब्दांकन:  कल्पेश मोहिते (रणांगण)

1

विरमातेला कोटी कोटी प्रणाम

काल  एका महान मातेचा पुण्यस्मरणाचा  दिवस होता
बरोबर ३३७ वर्षांपूर्वी १७ जून, १६७४ या दिवशी या महान मातेचे निधन झाले होते.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय चित्रपटाच्या स्क्रिप्ट लेखकाचे शब्द म्हणेज त्या माउलीच्या भावनांना मूर्त स्वरुपात दिलेलं रूप होतं ते शब्द म्हणजे " शिवबा केवळ आमचे पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहेत, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर  पण भ्याडपणे पळून जाऊन या  मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता काम नये."  अशा भावनेने आपल्या पुत्राला स्वराज्यासाठी घडवणार्‍या वीर मातेची  काल पुण्यतिथी झाली या वीर मातेला कोटी कोटी प्रणाम 

शब्दांकन : निवेदिता पाटील 




2

।।खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।


जन्म व बालपण
                 दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे बंधु चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागिरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी कार्तिक वद्य १४, शके १७५७ म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार १९ नोव्हेंबर १८३५ ला लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी तिचे नाव “मनकणिका” असे ठेवले व प्रेमाने “मनुताई” असे संबोधित. मनुताई रूपाने देखणी व हुशार होती. मनुताई ३-४ वर्षांची असतांनाच तिच्यावर मातृवियोगाचे दु:ख कोसळले. शेवटच्या बाजीराव पेशव्याच्या बरोबरच लक्ष्मीबाईचे वडील मोरोपंत तांबे हे हि ब्राम्हवार्तास येऊन राहिले होते. त्यामुळे त्यांच्या या कन्येला, धोंडोपंत, रावसाहेब, तात्या टोपे आदी तिच्या समकालीन मंडळींबरोबर घोड्यावर बसणे, शस्त्र संचालन करणे आदी युद्धोपयोगी विद्या व कलांचे शिक्षण मिळालेले होते व अल्पवयातच ती निपुण बनली होती.
 वैवाहिक जीवन 
                     वयाच्या ७ व्या वर्षी शके १७६४ च्या वैशाखात म्हणजेच १८४२ साली मनुताई यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी थाटामाटात पार पडला. मोरोपंत तांबे यांच्या मनुताई विवाहित होऊन झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. विवाहानंतर त्यांचे नाव 'लक्ष्मीबाई' असे ठेवण्यात आले. इ.१८५१ .मध्ये मार्गशीर्ष शु एकादशीला राणी लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्‍न जन्मले. गादीला वारस मिळाला म्हणून गंगाधररावांना अत्यानंद झाला. तो तीन महिन्यांचा असतांनाच काळाने त्याच्यावर झडप घातली. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई व गंगाधरराव यांना पुत्रवियोगाचे दु:ख सोसावे लागले.
पतिवियोगाचा धक्का आणि दत्तकविधान
                     मराठेशाहीत झाशीचे शासक हे पुण्याच्या पेशव्यांच्या अंकित राहणारे जहागीरदार होते. त्यांना राजा हा किताब मिळाला होता. सन १८१७ साली झाशीचे राजे रामचंद्रराव यांच्या बरोबर इंग्रजांनी मित्रत्वाचा तहनामा केला. त्यात झाशीचे राज्य वंशपरंपरेने रामचंद्ररावांच्या कुळातच ठेवले जाईल असे आश्वासन इंग्रज सरकार तर्फे देण्यात आले होते. पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने प्रकृति खंगलेले गंगाधरराव काही महिन्यांतच संग्रहणीच्या विकारास बळी पडले. गंगाधररावांच्या इच्छेनुसार गादीला वारस म्हणून नेवाळकर घराण्याच्या वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव दत्तक घेऊन त्याचे नाव 'दामोदरराव' ठेवले. दत्तक विधि झाल्यानंतर २१ नोव्हेंबर १८५३ रोजी दुपारी गंगाधररावांना मृत्यूने गाठले. पतिवियोगाच्या माध्यमातून वयाच्या १८ व्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुर्‍हाड कोसळली. " एम्पायर इन इंडिया" नामक पुस्तकात लेखक मेजर इव्हान्स वेल यांनी हे नमूद केले आहे. कि - " दत्तक घेण्याचा संस्कार हिंदू धर्माश्स्त्रास अनुसरून यथोचित रीतीने करण्यात आला होता. त्यावेळी इंग्रज अधिकारीही तेथे उपस्थित होते. आपण दत्तक मुलगा घेतला आहे याची सूचना गंगाधरराव यांनी मरणापूर्वी इंग्रज सरकारला दिली होती. "
'मेरी झाशी नही दूँगी' 
                इतके सर्व असूनही १८५४ साली आपणास दत्तक नामंजूर असल्याचे Governor General Lord Dalhousie याने कळवले. ईतकेच करून तो थांबला नाही तर त्याने झाशीचे राज्य खालसा करून टाकले व झाशीचे जडजवाहर व सर्व संपत्ती जप्त करून खजिन्यात जमा केली. त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईच्या मनात इंग्रजी शासनाबद्दल द्वेशाग्नी भडकून उठला. इंग्रजांचा नीचपणा आणखीही पुढे गेला होता; प्रजेच्या मनावर तिच्या संबंधीचा विलक्षण प्रभाव त्यांना नष्ट करायचा होता. त्यासाठी राणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यास त्यांनी प्रारंभ केला. पण राणीच्या चारित्र्याचा पूर्ण परिचय असलेल्या Major Malkam नामक एका विद्वान इंग्रजानेच परस्पर या आरोपाचे जोरदार खंडन केले. १६ मार्च १८५५ Governor General ला लिहिलेल्या सरकारी पत्रात त्याने नि: संदिग्ध भाषेत कळविले कि - " राणीचे चारित्र्य" अत्यंत उच्च प्रतीचे आहे आणि झाशीतील प्रत्येक मनुष्य तिच्याविषयीच्या आदराने भारावून गेलेला आहे." 
                 केवळ १८ वर्षाच्या कोवळ्या वयात विधवा झालेल्या या वीर महिलेने तिच्या हक्कावर, राज्यावर, संपत्तीवर व चारीत्र्यावरही इंग्रजांनी जो घोर अन्याय चालवला होता त्याखाली मान न वाकवता, त्याचा प्रतिकार करण्याचा अलौकिक धैर्य अंगी बाणवले. तिचं कर्तृत्वाचा काळ १८५४ ते १८५८ हा होता. तिच्या दिव्या गुणांच्या आविष्काराने दिपलेल्या इंग्रजानाही लाजेने मान खाली घालावी लागली. दत्तक नामंजूर करून झाशीचे राज्य व संपत्ती खालसा केल्यावर इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईला दरमहा रुपये ५००० /- पेन्शन देऊ केली, पण इंग्रजांनी फेकलेला हा भिकेचा तुकडा राणीने ठोकरीने उडवून लावला. " मै अपनी झाँसी नही दूंगी" असे तिने इंग्रज अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले. राणीने झाशीला स्वत:ची संघटना उभारली. झाशीतील स्त्रियांना तिने स्वत: युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. भावी स्वातंत्र्य युद्धासाठी प्रजेची माने तिने अनुकूल करून घेतली.
                                                        १८५७ चा संग्राम
                  १८५७ मधील जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने १० मे रोजी मीरत येथेही पेट घेतला. ४ जून १८५७ रोजी कानपूरला नानासाहेबांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्याच दिवशी राणीनेही झाशीचे स्वातंत्र्य घोषित केले. १२ नंबरची इंग्रजांची फलटण तिला येऊन मिळाली. कानपूर प्रमाणे झाशिनेही इंग्रजांच्या खजिन्यावर, दारूखान्यावर, प्रथम ताबा मिळवला. दि. ७ जूनला राणीने झाशीच्या किल्ल्यावर हल्ला चढवून तो जिंकून घेतला. स्वातंत्र्याचा ध्वज उभारून त्याची सर्वत्र द्वाही फिरविण्यात आली कि, ' खल्क खुदा का, मुल्क बादशहा का और हुकम राणी लक्ष्मीबाई का' ८ जून १८५७ पासून २४ मार्च १८५८ पर्यंत झाशीवर राणी लक्ष्मीबाईचाच अधिकार नांदत होता. ती झाशिलाच पक्के ठाण मांडून बसली होती. झाशी हे मध्य बर्तातल्या सर्व क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले. 
              त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली. इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक केली. २० मार्च १८५८ रोजी सर ह्यू रोज यांच्या सैन्याने झाशीपासून ३ मैलांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला व लक्ष्मीबाई यांना शरणागति पत्करावी, असा निरोप पाठवला. राणी हे जाणून होती. तिनेही वेध लढवण्याची पूर्वतयारी केली होती. दिवस राणीची फौज लढत होती. तिच्या सैन्यात स्त्रियांचा भरणा होता. प्रसंगी तोफा चालविण्याचेहि काम त्यांनी केले. किल्ल्याला इंग्रज फौजांनी पडलेली भगदाडे त्या महिला फौजेने रात्रीत बुजवून टाकली.१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात शेकडो वीर महिला आघाडीवर पुरुष योद्धयांच्याहि अग्रभागी तळपल्या. मोतीबाई नावाची एक स्त्री राणीच्या हेर खात्याची प्रमुख होती. ती धर्माने मुसलमान असून नाटकात स्त्री भूमिका करायची. एव्हढेच नव्हे तर सर्व प्रकारच्या बेमालूम भूमिका वठवायची. तो तिचं व्यवसाय होता. ती मुसलमान फकिराचा वेष बेमालूम वठवून शत्रूच्या गोटात प्रवेश करी व सर्वत्र संचार करून शत्रूकडील बातम्या काढून आणत असे. या कमी राणीला तिची मोलाची मदत मिळत होती. आपल्या गोटात स्वैर संचार करणारा व गोड गळ्याने सुस्वर गाणी म्हणणारा भिक्षेकरी फकीर म्हणजे एक स्त्री आहे आणि राणीच्या हेर खात्याची प्रमुख आहे हे इंग्रजांना कळलेच नाही. मोतीबाई फक्त नातीच नव्हती तर युद्धकलेतही निपुण होती. झाशीच्या वेढ्यातही वेळी महिलांच्या नगर रक्षक पाल्तानीची तीच सेनानी होती. 
                  मोतीबाई प्रमाणे राणीची दुसरी महत्वाची सरदार ललिताबाई बक्षी हि होती घोड्यावर स्वारी करण्यात ती निपुण होती झाशीच्या लढ्याच्या वेळी मोठ्या धाडसाने तटावरून किल्ल्यात चढून येणाचा प्रयत्न करणाऱ्या २ इंग्रज अधिकाऱ्यांना ललिता बक्षीने अश्वसंचालनात ती जितकी निपुण होती तितकीच तोफांची बिनचूक गोलंदाजी करण्यात हि तिचं हातखंडा होता. ललिता प्रमाणेच झलकारी हि एक राणीच्या विस्वसातली सेविका होती. "Lieutenant Bone" जेव्हा किल्ल्याच्या तटावर चढू लागला. तेव्हा मोठा धोंडा त्याच्यावर घालून झालकारीनेच त्याचा कपाळमोक्ष केला होता. लालीताप्रमाणेच तोफांची गोलंदाजी करण्यात निष्णात असलेली सुंदर नावाची एक दासी राणीजवळ होती. झाशीच्या वेढ्याच्या वेळी पुरुष गोलंदाज मारले गेल्यावर ललिता व सुंदर यांनीच तोफा चालवल्या. त्यांचे कर्तृत्व पाहून इंग्रज गोलंदाजांनी लज्जित होऊन आपले मोर्चे बदलले; म्हणून सर ह्यू रोजने फितुरीचा मार्ग अवलंबला. अखेर ३ एप्रिल रोजी सर ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला. सैन्याने झाशीतील लोकांची लुटालूट करण्यास सुरुवात केली.
                राणी लक्ष्मीबाई प्रमाणे दिसणारी तिची काशी नावाची एक दासी होती. तीही शूर व धाडशी होती महिला होती. झाशीच वेढा लढविणे अशक्य झाल्याने वेढा फोडून काल्पीस निघून जाण्याचा राणीने निश्चय केला. प्रसंग आणीबाणीचा होता. इंग्रज शहरात घुसले होते . अशा प्रसंगी लढत - लढत जाण्याखेरीज मार्ग नव्हता. पण त्यामुळे राणी इंग्रजांच्या हाती लागण्याची शक्यता होती अशा प्रसंगी राणीसारख्याच दिसणाऱ्या काशीने राणीचा पोशाख केला व काही स्वार बरोबर घेऊन घोडा दौडवीत ती तटाच्या बाहेर पडली. ‘अरे, हि पहा राणी चालली' असे म्हणून इंग्रज फौज तिच्यावर तुटून पडली. या संधीचा फायदा घेऊन खरी राणी सध्या पोशाखात आपल्या निवडक आणि विश्वासू स्वारांसह किल्ल्याबाहेर निघाली. या दरम्यान वडील मोरोपंत त्यांच्या समवेत होते. फळी तोडून बाहेर जातांना इंग्रजांच्या फौजांबरोबर झालेल्या हातघाईच्या लढाईत ते घायाळ झाले. इंग्रजांनी त्यांना पकडले आणि फाशी दिले परंतु राणी दूर निघून गेली व तितक्यात काशिनेही त्यांना झुकांडी दिली व ती अगदी वेगाने घोडा दौडवीत लवकरच काल्पीच्या रस्त्यावर आपल्या परमप्रिय स्वमिनीच्या तुकडीत येवून मिळाली. 
काल्पीची झुंज 
                   झाशी सोडून राणी एका दिवसात १०८ मैलाची मजल मारून काल्पीला पोहोचली झाशीच हा १२ दिवसांचा संग्राम युद्ध इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला आहे. राणी झाशीहून निघून गेलेली पाहून सर ह्यु रोज काल्पीवर चालून गेला व ती स्वताच आपली फौज घेवून रोज वर चालून गेली काल्पी पासून ४२ मैलावर कांचागावत तिने इंग्रजी फौजेला गाठले. घनघोर लढाई झाली. पण तिला हवी तशी मदत ना मिळाल्यामुळे शेवटी पराभव पत्करावा लागला. पण पुन्हा फौज सुसंघटीत करून ती काल्पीला परतली आता तर सर ह्यु ने काल्पिवरच आक्रमण केले. तेव्हाही लक्ष्मीबाईच पुन्हा त्याच्याशी लढली. इंग्रजांची उजवी बाजू पार मोडून पडली त्यामुळे इंग्रज गोलंदाज तोफा सोडून पळाले. क्रांतीवाद्यांच्या फौजेत सुव्यवस्था, स्वामीनिष्ठा, नसल्याने शेवटी काल्पी इंग्रजांच्या हाती गेले. 
               काल्पी येथे पराभूत झालेले रावसाहेब पेशवे, बांद्याचे नबाब, तात्या टोपे, झाशीची राणी आणि प्रमुख सरदार गोपाळपूर येथे एकत्र जमले. लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर हस्तगत करण्याची सूचना केली. ग्वाल्हेरचे शिंदे अजूनही ब्रिटिशधार्जिणे होते. राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले. आता ग्वाल्हेर क्रांतीवाद्यांचे केंद्र बनले. १५ जून १८५८ रोजी सर ह्यु रोज ग्वाल्हेरवर चालून आला यावेळ राणीनेच रोजला प्रतिकार केला. त्यावेळी General स्मिथ रोज च्या सहाय्याला आला १५-१७ जून हे तीनही दिवस राणी इंग्रज फौजेवर तुटून पडली. ग्वाल्हेरवरील विजयाचे वृत्त सर ह्यू रोजला कळले होते. वेळेचा अपव्यय केल्यास आपली परिस्थिति अवघड होईल, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या सैन्याचा मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला. १६ जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. सर ह्यू रोज यांचा लक्ष्मीबाई व पेशवे यांनी मुकाबला करण्याचे ठरवले. ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचे रक्षण करण्याचे काम लक्ष्मीबाई यांनी स्वत:च्या अंगावर घेतले. लढाईत लक्ष्मीबाई यांचे अभूतपूर्व धैर्य पाहून सैनिकांना स्फूर्ति आली. त्यांच्या मुंदर आणि काशी या दासीसुद्धा पुरुषी वेषात लढाईसाठी आल्या. राणीच्या शौर्यामुळे इंग्रजांना त्या दिवशी माघार घ्यावी लागली. १८ जूनला राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे हताश झालेल्या इंग्रजांनी ग्वाल्हेरवर सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला. या वेळी त्यांनी शरणागति न पत्करता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले. राणी आता संपूर्ण घेरली गेली तिच्याजवळ १५-१६ च घोडेस्वार उरले होते. पण ती रणरागिणी इंग्रज सेनेला कापीत पुढे निघाली. फळी फोडून ती भरधाव निघाली तिच्या मागावर इंग्रज तुकडी निघाली त्याच्याशी राणीच्या चकमकी चालू झाल्या त्यात मुंदर कामी आली दोन्ही कडील मनुष्यबळ कमी होऊ लागले. फळी फोडून जात असतांना फुलबागेचा एक ओढा आडवा आला. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे नेहमीचा 'राजरत्‍न' घोडा नसल्याने दुसरा घोडा ओढ्यापाशीच गरगर फिरू लागला. राणी लक्ष्मीबाई यांनी आपले भवितव्य ओळखून चालून आलेल्या गोर्‍यांवर हल्ला केला. यात त्या रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. पुरुषी वेशात असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज स्वार ओळखू शकले नाहीत. त्या पडताच ते स्वार परत निघून गेले. राणी लक्ष्मीबाई यांच्या एकनिष्ठ सेवकांनी जवळच असलेल्या गंगादास यांच्या मठात नेऊन त्यांच्या मुखात गंगोदक घातले. आपल्या देहास म्लेंच्छांचा हात लागू नये, अशी इच्छा प्रदर्शित करून त्यांनी वीर मरण स्वीकारले.

                 जगभर पसरलेल्या क्रांतिकारकांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि सरतेशेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला याच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने स्फूर्ति दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झाशीच्या राणी अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या. अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी शतश: प्रणाम
झांशीवाली 
अवघ्या तेविसाव्या वर्षी रणांगणात हौतात्म्य पत्करणार्‍या झाशीच्या राणीचे चरित्र स्फूर्तीदायी आहे. १८५७ च्या संग्रामात आधी झाशी, नंतर काल्पी आणि शेवटी ग्वाल्हेर येथील लढायांमध्ये आपल्या असामान्य क्षात्रवृत्तीची चुणूक दाखवून तिने ब्रिटिशांना चकित केले. झाशीचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटीश सेनापती सर ह्यू रोज याला शेवटी फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. आपल्या पुत्राला पाठीशी बांधून लढाई करणारी अशी असामान्य स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही ! पहिल्या महायुद्धातील `गदर' पक्षाच्या देशभक्‍तांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि स्वा. सावरकरांपासून सुभाषचंद्रांपर्यंत सर्व क्रांतीकारकांना स्फूर्ती देणार्‍या या रणचंडिकेचा पराक्रम व वीरमरण दैदिप्यमान आहे !! 

जेष्ठ कृष्ण सप्‍तमी रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन असतो. कवी भा.रा. तांबे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर केलेली कविता येथे देत आहोत.

हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।
रे हिंदबांधवा ।।१।।

घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगि तलवार
खणखणा करित ती वार
गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली
रे हिंद बांधवा ।।२।।

कडकडा कडाडे बिजली
इंग्रजी लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली
रे हिंद बांधवा ।।३।।

मिळतील इथे शाहीर
लववितील माना वीर
तरूझरे ढाळतील नीर
ह्या दगडा फुटतील जिभा
कथाया कथा सकळ काळी
रे हिंद बांधवा ।।४।।

कवी - भा.रा. तांबे (१९३९)

संकल्पना व शब्दांकन : निवेदिता पाटील आणि निखिल देशपांडे 



2

कुणास ठाऊक.... (अनुवाद)


माझ्या एका गुजराती मित्राने लिहिलेली हि कविता...

કેવી રીતે....

નથી સમજતું તને સમજાવું કેવી રીતે...
તારા વિના દિલને સમજાવું કેવી રીતે...

ખ્વાબોમાં મળું છું આપને દરરોજ....
પણ ના જાનુ ખ્વાબ હકીકત થાય કેવી રીતે....

લાખ કોશિશો કરો તને મળવાની....
પણ કોશિશો કામયાબ થાઇ કેવી રીતે....

બંધ હોટે દિલ ની વાત કરી તારી સાથે....
પણ આ વાત તને સમજાય કેવી રીતે..

હા... સફરતો જોન્દગીના એકજ છે....
પણ નથી જાણતો હમસફર થવાય કેવી રીતે.....

- તેજસ

आणि तिचा मी केलेला हा मराठी अनुवाद... जमलाय का बघा....माझा पहिलाच प्रयत्न आहे...

कुणास ठाऊक....

तुझ्या मनीचे गुज कसे समजू कुणास ठाऊक??
तू नसतांना माझ्या मनाला कसं समजावू... कुणास ठाऊक??

स्वप्नात तर रोज होते तुझी भेट...
पण हे स्वप्न सत्यात येणार कसे... कुणास ठाऊक??

तुला भेटण्याचा प्रयत्न तर नेहमीच असतो माझा...
हा प्रयत्न सफल कधी होणार... कुणास ठाऊक??

मिटल्या ओठांनी हितगुज तर नेहमीच चालते माझे...
पण हे गुज तुला कळणार ग कसे... कुणास ठाऊक.??

माझ्या ह्या आयुष्याचा प्रवास आहे ग एकच....
तुझी सोबत मिळेल का त्यात....कुणास ठाऊक.??

अनुवाद: (c) पियू (१४.६.२०११)
0

मराठी

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
कवी- कुसुमाग्रज
संगीतकार- कौशल श्री. इनामदार

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दर्‍याखोर्‍यातील शिळा

हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली न मान

हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशांतील शिळा

5

मन उधाण वाऱ्याचे... गुज पावसाचे...........

             पाऊस आणि मुंबईकर एक अतूट नात आहे. कारण कडक उन्हाळ्यात लोकल च्या प्रवासाने घामाघूम झालेला मुंबईकर सुखावतो तो याच पावसाने. अल्हाददायक पहिल्या पावसामुळे सुटलेला मातीचा सुगंध परफ्युम पेक्षाही मनाला भावतो तो ह्याच पावसामुळे.ठिकठिकाणी जमलेलं पाणी त्यामुळे झालेली वाहतुकीची कोंडी, पावसामुळे झालेला चिखल, कपडे सांभाळत ऑफिस ला जायला होणारा उशीर म्हणून मुंबईकरांना वैताग येतो तो याच पावसाचा; पण जरा कुठे पावसाने दडी मारली कि मुंबईकर चर्चा करतो ती याच पावसाची.

             २६ जुलै २००५ मुंबईकरांच्या सर्वात कटू आठवणी आहेत त्या याच पावसाबरोबर. आलेल्या प्रसंगाला तोंड देत आपलं स्पिरीट दाखवलं होतं ते याच पावसाला. शेजारच्याला घरात घेताना पण १० वेळा विचार करणारे मुंबईकर कसलाही विचार न करता मदतीला पुरात अडकलेल्यांच्या मदतीला धावून गेला तो याच पावसात. आपले पिल्ले घरी पोहोचली नसली तरी पाण्यात अडकलेल्या भुकेल्या जीवांच्या पोटात गरम- गरम जावं म्हणून २ मिनिटं वाली मॅगी का होईना पण बनवून खायला घालणाऱ्या आयांची ओळख झाली ती याच पावसात.

           दादर माटुंगा या सारख्या सखल भागात पाणी साचले तरी त्याची पर्वा न करता मुंबईकर  आनंद लुटतो तो याच पावसाचा. पण हाच पाऊस विकांताला पडला तर मग तो रीमिझीम बरसणारा असो वा धो-धो कोसळणारा असो बेधुंद होऊन मुंबईकरांची पाऊले वळतात ती वरळी सी फेस किंवा मग मरीन ड्राईव्ह वर. आणि अश्याच पावसाचा आस्वाद घेताना टिपलेली हि छायाचित्रे 























शब्दांकन :  निवेदिता पाटील
छायाचित्रे : भरत पालव 
8

सुरवात

करतोय मी सुरवात खरी
पण शेवट कुठंय? ते माहित नाही
लिहायचे ते खूप काही
पण वाचेन का कुणी? ते माहित नाही
ऐकले आहे पण मी हे
कि दाद इथे मिळते
मिळेल मला केंव्हा, कधी ते माहित नाही
माहित आहे इतके कि
मी शिष्य आहे ज्यांचा
ओळखतील का मला ते तरी माहित नाही
आज मी हे सांगतो कि हरवलो मी हरवलो
शोधीत मला येईल का ती? हेही मला माहित नाही
15

तुझी सोबत तुझा सहवास....

तुझी सोबत तुझा सहवास....
माझं स्वप्न कि माझा भास....

तुझ्या हात माझे हात...आणि आपली बिनखर्चाची पायपीट....
माझी अखंड बडबड आणि तुझ्या कानाशी कीटकीट ...
तरीही माझ्या बोलण्याकडे..तुझं लक्ष खास...
तुझी सोबत..तुझा सहवास...

तुझ्या डोळ्यात सांर काही कळल्याचा भाव...
चेहऱ्यावर मात्र पांघरलेला...साळसूदपणाचा आव...
क्षणात माझा..क्षणात परका...अगदी अनोळखी माणसासारखा...
तरीही तुझ्या वागण्यात...आपलेपणा खास....
तुझी सोबत..तुझा सहवास...

मी तुझा Boyfriend आहे असं just suppose ....
असं म्हणून तुला मारायचंय खोट खोट propose ...
होकार मात्र खरंच हवाय तुला अगदी मनातून...
नाही म्हणाले तर गमावेन का रे..मी तुला हातातून??
हीच चिंता..हीच काळजी.. हाच झालाय त्रास....
तुझी सोबत..तुझा सहवास...

असली जरी आपल्यामध्ये ओळख आणि सख्य....
होकार देण मात्र तुला...नाही मला शक्य...
खोट खोट प्रेम करणं मला नाही जमत ...
जास्त दिवस असल्या खेळात.. मन नाही रमत...
तरीही तुझ्या आठवणीत..मी रमते तासंतास...
तुझी सोबत तुझा सहवास....
माझं स्वप्न कि माझा भास...

-(c) पियू (०५.०९.२००७)
3

... अपूर्ण ('इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून)


पु. ल. चा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्यांच्या १९७४ साली इचलकरंजी येथे झालेल्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून हा उतारा देत आहे.

.... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.



जो जे वांछील तो ते लिहो यामागे जीवन अधिक सुंदर करण्यासाठी, दुरितांचे तिमीर घालवण्यासाठी, ही भावना नसेल तर कालनिर्मितीच्या मुख्य प्रेरणेशीच ही प्रतारणा होईल. आणि म्हणून इथे लेखक आणि वाचक या दोघांनाही आपली जबाबदारी कळायला हवी. आज पु. ल. चा स्मृतिदिन त्या निमित्ताने त्याना मानाचा मुजरा.


तू गेलास, उद्या मीही नाहीशी होणार,पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द,
मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना?
- सुनिता देशपांडे


2

ऐकावे जनाचे करावे मनाचे



एकदा २ बेडूक दुधाच्या भांड्यात पडले खूप प्रयत्न करून सुद्धा दोघांना बाहेर पडता येत नव्हते ,वरून काही बेडूक त्यांना असे करा, तसे करा म्हणून सल्ले देत होते, खूप प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता येत नाही म्हणून त्यांच्या सहकार्यांनी त्यांचे आता काही होणार नाही आता फक्त देवच तुम्हाला वाचवू शकतो म्हणून देवाचे स्मरण करा असे सांगितले. त्यामधला एक बेडूक तो सतत हात पाय मारत होता, तर दुसरा प्रयत्न करणे सोडून देवाचे नामस्मरण करू लागला हा बेडूक अजूनही प्रयत्न करत होता सतत त्या दुधावर हात पाय मारत होता ...सतत हात पाय मारल्याने त्याच्या अंगाची घाण त्या दुधात पडली आणि ते दुध फाटले, त्यामुळे दुधाचा जड भाग खाली राहिला आणि पाणी वर आले . दुसरा बेडूक मात्र प्रयत्न न केल्यामुळे मरून पाण्यावर तरंगत होता ,या बेडकाचे प्रयत्न चालू होते दिवस भर तो हात पाय मारून प्रयत्न करत होता. त्यामुळे पाणी अजून वर आले आणि तो बेडूक बाहेर पडला बाहेर आल्या नंतर त्याच्या सहकारी बेडकांनी त्याला विचारले आम्ही जे सांगत होतो ,ते तू का ऐकलेस नाहीस ..नंतर कळाले तो बेडूक बहिरा होता ....सांगायचं उद्देश हाच कि कोणी किती जरी सांगितले तरी आपल्या मनाला जे पटेल तेच करावे ...म्हणजेच ...

ऐकावे जनाचे करावे मनाचे

Powered by Blogger.

आम्हीं जगभर