1

पुस्तक परिचय स्पर्धा २०१२ - माहिती व नियमावली



'मीमराठी.नेट'(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी 'ललित लेखन स्पर्धा', 'लघुकथा स्पर्धा' तसेच 'कविता स्पर्धा' यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल 'मीमराठी.नेट' सर्वांचा ऋणी आहे.
या वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या 'रसिक साहित्य प्रा. लि.'च्या व 'मीमराठी'यांच्या सहयोगाने "पुस्तक परिचय स्पर्धा २०१२" आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.
सदर स्पर्धा अठरा ते पन्नास या वयोगटातील लेखकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी 'ललित लेख', 'कवितासंग्रह', 'कथासंग्रह', 'कादंबरी' या पैकी एका प्रकारातील सन १९९० ते २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकाचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील 'पुस्तक परिचय स्पर्धा' विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.

नियमावली

१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.
२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
३. लेखनाचा प्रकार हा 'पुस्तक परिचय' असा ठेवण्यात आला आहे. परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील सन १९९० ते २०१० कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.

ललित लेख
कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
कादंबरी
काव्यसंग्रह

प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (२०००) शब्दांचा असावा.
४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.
अ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.
ब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.
पत्ता: -
‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’रसिक साहित्य प्रा. लि.
६८३, बुधवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे – ४११ ००२
५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. ६. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील 'competition2012@mimarathi.net' या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.

लेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)
प्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)
संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)
ब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)
पत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).


७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.
८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.
९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.
११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, 'रसिक साहित्य' तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्‍या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.
१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या पहिल्या सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.
१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
▐ ■ αттιтυ∂є ιѕ α ℓιттℓє тнιηg тнαт мαкєѕ α вιg ∂郃єяєη¢є■▐

4

मास्टरपिस: I Too Had a Love Story

 ( पुर्वप्रकाशित: मास्टरपिस: I Too Had a Love Story)
 


लेखक: रविंदर सिंग
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Srishti Publishers & Distributors


मध्यंतरी परिक्षेच्या नादात वाचन पुर्णपणे बंद होतं. महिना-दोन महिने वाचन नसल्यामुळे आपोआपच काहितरी वाचावस वाटू लागलं. घरची आई-आजोबांनी वाचुन संग्रहित केलेल्या पुस्तकांची अतुल्य लायब्ररी जरी असली तरी जास्तीत जास्त पुस्तकं ही एकतर अध्यात्म ज्याचा माझ्याशी दुर-दुर चा संबंध नाही :D आणि ती सोडली तर राहिलेली थोडी फार जुनी-नवी पुस्तकं. पण वयाचा परिणाम म्हणा किंवा अचानक आलेली हुक्की पण "Love Story" वाचाविशी वाटू लागली. मित्रांकडेही काही पुस्तकं होती पण ती काय रुचली नाहीत. मग सहज फ्लिपकार्टवर सर्च केलं आणि "I Too Had a Love Story" हे National Best Selling Book च्या यादित दिसलं. पुस्तक खरेदी करणार्‍यांचे रिव्ह्यु वाचले तर सर्वांनी ४/५ स्टार दिलेले. मग कोणताही विचार न करता घेतलं विकत.

२ दिवसांत पुस्तक माझ्या हातात होतं. लगेच घेतलं वाचायला. प्रस्तावना वगैरे गाळून डायरेक्ट कथेलाच हात घातला. ४ इंजिनिअरिंगचे मित्र, बर्‍याच दिवसांनी एकत्र येतात. जवळ-जवळ ४ वर्षांनी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेटल झालेला असतो. मग इकड-तिकडच्या गप्पा. वगैरे- वगैरे. सुरवात वाचल्यावर वाटू लागलं "च्यायला, अजुन एक " 5 point Someone" दिसतयं." थोडासा निराष झालो. पण आता घेतलयं एवढ्या हौसेने तर वाचलं तरी पाहिजेच! मग परत घेतलं वाचायला आणि तोच माझा सगळ्यात योग्य निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही. I Too Had a Love Story या पुस्तकाला मी "एक मास्टरपिस" असं म्हणेन.

कथेचा नायक रविन म्हणजेच स्वतः लेखक रविंदर सिंग. एक पंजाबी इंजिनिअर. वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड पण अजुनही बॅचलर. मित्रांच्यात पैज लागते की कोण पहिले लग्न करणार! साधारण नायक हा लग्नाच्या विचारातही नसलेला पण मित्रांना त्याच्यावरच खात्री असते की "आमच्यात पहिले लग्न तुझेच होणार!". मग मित्रांच्यात इंटरनेट विश्वात घडणार्‍या नव्या क्रांती विषयी चर्चा होते आणि विषय निघतो "मॅट्रीमोनिअल साईट" म्हणजेच "विवाहसंस्था संकेतस्थळ" www.Shadi.com बद्दल. चौघांपैकी फक्त एकच मित्र या नव्या पद्धतिच्या बाजूने असतो तर नायकासह उरलेले तिघे त्याच्या विरोधात. पण तो मित्र या तिघांना पटवून देतो की आपण आपल्यासाठी कशी साथिदार हवी आहे हे दिलेल्या categories मधून अगदी एका click सरशी बघू शकतो वगैरे वगैरे. पण तरिही हे लोक काही त्याच बोलण ऐकून घेत नाहीत.

नंतर थोड्या दिवसांनी नायक सहज मजा म्हणून त्या संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल बनवतो. नंबर वगैरे देतो, त्याला कशी मुलगी पाहिजे वगैरे माहिती भरतो. सगळ व्यवस्थित झाल्यावर ते संकेतस्थळ त्याला क्षणात त्याच्या अपेक्षा पुर्ण करणार्‍या मुलिंची यादी दाखवते. हा प्रकार पाहून तोही हदरतो की इतक्या झटक्यात माझी "ड्रिमगर्ल" तेही इतक्या "ऑपशन्समधे" ? मग त्यातल्या बर्‍याच जणिंशी संपर्क साधतो. काही उत्तर देतात. काहिना तो आवडतो तर त्याला त्यातली कोणिच नाही आणि एके दिवशी त्याची "परफेक्ट मॅच" त्याला भेटतेच.

त्या दोघांच्यात पहिले मैत्री आणि नंतर हळूहळू प्रेम होते. एकमेकांना प्रत्यक्षात कधिही न पाहता देखिल ते एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतात. थकवणारे दोघांचे शेड्युल असले तरी रात्र-रात्र फोनवर गप्पा मारण्यात घालवू लागतात. त्यांचा रोमांस वा़चताना खरोखरच मजा येते. माझ्या नशिबी अजुनतरी असलं काही नाही आलं (लवकर येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ;) )पण तरिही वाचताना खुप मजा आली. एक विशेष म्हणजे कोठेही "वासना" दिसली नाही आणि हिच या लेखकाबद्दलची आवडलेली गोष्ट. अगदी सरळ साधं निर्मळ प्रेम. आणि तेही इतकं की एकमेकांना न बघताही एकमेकांना साताजन्माचे जिवनसाथी मानू लागलेले.

पुस्तक खुप सुंदर सुरू होतं. ते दोघे एकमेकांसाठीच जणू बनले असतिल, कोणाची द्रुष्टच लागावी असं त्यांच प्रेम. पण काय कोणास ठाऊक त्यादिवशी मला कोणती विपरित बुद्धी झाली. अचानक बसल्या बसल्या प्रस्तावना वाचली. आणि त्यात लिहिलेलं "प्रत्येक प्रेमकहाणी ही पुर्ण होतेच असं नाही!" ..... बस्स......! माझ्या काळजाचा ठेका चुकला. हा काय प्रकार आहे? नेमकं काय झालं असेल त्यांच्या प्रेमाला? कोणाची नजर लागली असेल? नायिका नायकाशी "टाईमपास" तर करत नसेल? किंवा तिची ती प्रोफ़ाईल ज्यावर नायकाने विश्वास ठेवला ती खोटी तरी नसेल? की आणखी काही.....? सतराशेसाठ शंका मनात आल्या. एकेक पान वाचताना ह्रदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. परिक्षा जवळ आल्यावर जशी भिती वाटते तशी काहिशी भिती वाटू लागली. आणि खरच सांगतो अशी प्रेमकथा कोण्या दुष्मनावरही येऊ नये. ;(

एखादी व्यक्ती जेव्हा दुसर्‍यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, स्वतःचं आयुष्य जीच्यावर ओवाळून टाकते तिच व्यत्की जेव्हा मिळत नाही तेव्हा होणारे ते दुःख खरच अंगावर काटा आणते. माझ्यासारखा कठोर मनाचा (माझ्या आईच्या भाषेत "दगड" :)) ) असलेलाही वाचताना कित्येकवेळा डोळ्यात अश्रू काढतो यावरच या लेखकाची ही लेखणी किती प्रभावशाली असेल याचा अंदाज येतो. पुस्तकाचा शेवट नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.

मला पुस्तक इतकं आवडलं की मी नेटवर आणखी माहिती काढायचा प्रयत्न केला. तेव्हा समजलं की ही त्या लेखकाची "सत्यकथा" आहे. मी त्या नायिकेचाही शोध घेतला. मजा म्हणजे त्या नायिकेचा फेसबुकवर "फॅनपेज" आहे आणि मी ही त्याला "Like" केलय! तेवढ्यात मला या कथेचा पुढचा भाग फ्लिपकार्टवर दिसला. आता तोही मागवला आहे. लवकरच वाचून त्याचाही रिव्ह्यु ब्लॉगवर प्रसिद्ध करतो.


का वाचावे
एक निर्मळ प्रेमकथा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे "सत्यकथा". माझ्या वयाच्याच काय पण अगदी प्रौढांनाही वाचताना मजा येईल. कदाचित त्यांच्या पर्सनल Love Stories ज्या पुर्ण झाल्या - नझाल्या त्या ताज्या होतिल. ;) खरच म्हणतात ना "Life never stops" . वाचताना आपणच नायक आहोत असा काहिवेळा मला भास झाला इतकं प्रभावी लेखन! माझ्यामते हे एक "Must Read" पुस्तक आहे.

का वाचू नये

तसे काहीच कारण नाही. आणि द्यायचेच झाले तर तुम्ही "ब्रम्हचारी" असाल तरच वाचू नका असे म्हणावे लागेल! :D :))
ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. "Must Read" पुस्तक.  मी या पुस्तकाला रेटिंग देईन:


-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

0

असच काहितरी....!

 ( पुर्वप्रकाशित: असच काहितरी....!   )      

                     आज सकाळी सलूनमधे  जाण्याचा योग आला. मांसाहेबांच्या आग्रहास्तव जावे लागले. :D . नेहमीचाच नाव्ही. "या साहेब. बसा!" असे आदबिने स्वागत झाले. नेहमीच म्हणजे अगदी लहान असल्यापासून त्याच्याच दुकानात जायचो. त्याने सांगितलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. त्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात एक गृहस्थ आपल्या छोट्या मुलासोबत दुकानात आले. नेहमी प्रमाणे त्या नाव्ह्याने त्यांचेही "या साहेब बसा. अरे वा आज छोटेसाहेबपण आलेत. छान छान. बसा!" असे स्वागत केले.

                         ते गृहस्थ माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले आणि त्यांच्या पलिकडच्या खुर्चीवर छोटेसाहेब बसले. तेवढ्यात त्या नाव्ह्याने कपाटावरचा स्टूल काढला आणि त्या छोट्या साहेबांना खुर्चीवरून उचलून खाली ठेवले. मग तो स्टूल त्या खुर्चीवर ठेवला आणि मग छोट्यासाहेबांना त्यावर बसवले. त्यामागचा हेतू हाच की नाव्ह्याला काम करताना उंची योग्य मिळावी.

                      क्षणात मला माझं लहानपण आठवलं. लहान असताना मी ही बाबांसोबत कटींगला जायचो. याच नाव्ह्याच्या दुकानात. तेव्हाही माझं "छोटे साहेब" असच स्वागत व्हायच. कोणीतरी आपल्याला "साहेब" म्हणतयं  मग ते "छोटे" का असेना पण "साहेब" म्हणतय हे ऐकुन खूप मस्त वाटायचं. :D आपोआपच मग माझ वागणं एखाद्या साहेबासारखं व्हायचं.  आधिच "साहेब" म्हटल्यामुळं मुठभर मांस वाढलेलं असायच पण तेवढ्यात तो नाव्ही हातात स्टुल घेऊन येताना दिसला की भयानक राग यायच. माहित नाही का? पण भयानक राग यायचा. खुर्चीवर स्टुल आणि स्टुलवर मी बसायच? साहेबानं बसायच तेही स्टुलावर? :-o अपमान! घोर अपमान वाटायचा. माझे बाबा पण "साहेब" आहेत! मग ते तेवढे खुर्चीवर डायरेक्ट बसणार आणि मला तेवढं स्टुलावर का? असा काहिसा विचार यायचा. पण काय करणार? आमचं थोडच काही चालायचं? कितीही इच्छा नसली तरी तो नाव्ही मला "उचलून" त्या स्टुलावर बसवायचाच! :D मग एक नाव्ही बाबांची कटिंग सुरू करायचा. बाबा त्याला काहिश्या सुचना करायचे, "हे असं काप, इथे जरा केस ठेव, वगैरे वगैरे" मग माझा नाव्ही बाबांनाच माझ्या कटींगबद्दल विचारायचा आणि बाबा म्हणायचे, "काही नाही, एकदम बारिक कर!". :-o परत अपमान! घोर अपमान! बाबा त्यांच्या नाव्ह्याला तेवढे  सुचना करणार  आणि माझ्या नाव्ह्याला काहिच नाही?? पण हे आमचं सगळं मनातल्या मनात. :))

                           माझी कटिंग लवकर संपायची. मग मी बाकड्यावर जाऊन बसायचो. बाबांची कटिंग अजून सुरूच असायची. मग नाव्ही काय काय करतो ते मी न्याहाळत बसायचो. बाबांची कटिंग झाली की मग बाबांची दाढी असायची. तो नाव्ही ब्रशने त्यांच्या गालावर फेस करायचा. ते बघुन खुप मजा यायची. तो नाव्ही ब्रश बाबांच्या गालावरून असा काही फिरवायचा की वाटायचं की एखाद मोरपिसच फिरतय! बाबांना गुदगुल्या होत नसतिल का? किंवा किती मज्जा वाटत असेल बाबांना  किंवा कसं वाटत असेल गालावर फेस लावल्यावर? वगैरे सतराशे साठ असले काहितरी प्रश्न मनात यायचे. :))  मग मनात विचार यायचा, "आपण कधी मोठे होणार? आपण कधी स्वतः नाव्ह्याला सुचना करणार? आपल्या गालावर कधी फेस लागणार?" :-/

                    तेवढ्यात नाव्ह्याने पाण्याचा स्प्रे डोक्यावर मारला आणि मी भानावर आलो. मग त्यानेच विचारलं "साहेब काय करू? मेडियम की बारिक? दाढी करायचिये का?" वगैरे, वगैरे! हम्म्म...! आता झालो मोठा. आता मला विचारलं जातं. आता मी स्टुलावर नाही तर डायरेक्ट खुर्चीवर बसतो. आता माझ्याही गालावर फेस केला जातो. पण खरच लहानपणच बरं होत. कशाची काही चिंता नाही. दाढीची कटकट नाही . बाबांच्या सोबत बिनधास्त जायचं. वेगळच "सेक्युर" वाटायचं.

                        कधी कधी असच काहितरी सुचतं. म्हटलं बघाव ब्लॉगवर टाकून आणखी किती जणांना असं वाटायचं..... :D बालिश जरी असलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांत एक छोटं मुल नक्कीच कोठेतरी दडलेलं असतं जे असले काहितरी विचार डोक्यात आणत असतं! मला खात्री आहे की कधिना कधी माझ्यासारखच तुम्हालाही वाटलं असणारच! काय मग? बरोबर आहे ना? ;)

-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर
8

परत येशील का???

प्रिय कल्पि,

तुला हे पत्र लिहितेय खंर... पण तुला ते मिळेल का नाही माहित नाही...

कारण तू अचानक कुठेतरी दूर निघून गेलास... सगळे म्हणतात कि माझा भाऊ देवाघरी गेला... मला नाही खंर वाटत... आता तुच सांग सगळ्यांना कि तू इथेच आहेस म्हणून... पटकन या पोस्ट वर कमेंट कर आणि सगळ्यांना चकित कर...

तूच म्हणत होतास ना अजून एक गेट- टुगेदर करूयात.. कोकणात जाऊयात...
चल की.. तू म्हणशील तिथे जाऊ... खूप मजा येते तू सोबत असताना.. तू, भरत आणि गण्या.... आपल्या ग्रुप च हिट त्रिकुट...

मी तर तुला एकदाच भेटले प्रत्यक्ष.. नुकत्याच झालेल्या आपल्या सारसबाग भेटीत... पण बझ्झ अगदी नवीन होत तेव्हाची आपली ओळख.. रोज.. अगदी रोज.. आपली नेट भेट ठरलेली..

अगदी बॉसचा ओरडा खाल्ला इथपासून आज मी नवीन ड्रेस घातलाय इथपर्यंत सगळ काही मी बझ्झ वर टाकायची.. आणि कुणाचा रिप्लाय येवो न येवो.. तुझा नक्की यायचा...

आपण कसे एकत्र आलो आता आठवत नाही.. पण बझ्झ वरचा तू माझा पहिला मित्र होतास.. ग्रुप मधल्या इतर कोणाच्याही आधीपासून...

आपल्या ग्रुप मध्ये कोणाशीही कसलाही वाद वैगेरे न झालेला.. प्रत्येक वेळी पडती बाजू घेणारा.. कोणाचीही खोडी वैगेरे न काढणारा असा माझा सगळ्यात लाडका भाऊ... अगदी आपल्या ग्रुप मधल्या मुलींच्या बझ्झ वर काहीही वेडेवाकडे लिहिणार्याला चांगला इंगा दाखवण्यापासून ते बझ्झ वर झालेल्या एका वादातून मला सावरणारा तूच होतास...

आठवतंय तुला.. आपल बझ्झ मराठी मित्र मंडळ स्थापन झालं त्याचा पहिला अध्यक्ष तूच होतास.. आणि आपल्या मंडळांच चिन्ह म्हणून ती धारधार भवानी तलवार निवडणारा तूच...

आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यांना एकत्र आणणारही तूच होतास आणि भेटूयात भेटूयात असं म्हणून पुढाकार घेणारही तूच... तुझ्यासोबत तुझ्या ब्लॉगलाही पोरकं करून गेलास...

आज पुन्हा पुन्हा आपल्या त्या भेटीचा वृतांत वाचते आहे.. घाई गडबडीत सुद्धा एकाचाही उल्लेख करण्यात तू चुकला नाहीस.. आणि आता पुन्हा आपली भेट होईल त्याच्या वृत्तांत सुद्धा..

गर्द कोवळ्या मनाची हा कुठे श्वास कोंडला!

काळोखाच्या उंबऱ्यात का जीव असा सोडला!!
धुंद विश्वात जगणे आतुर भेटी बहु पाहुणे!
काळोखी जणू मनुचीया हि सावज झाली मने!! धृ.!!

हृदयी प्रेमे, चेहरे अनामिक काळजात ठासले!
एकलाची जणू जीव जगी या जगण्यास फेकले!!
प्रश्नाच्या या जंजाळातून उत्तरे ना स्तवने!!१.!!
काळोखी जणू मनुचीया.....

तव धनुष्या टोकावरची धार पुनः बोथटली!
सप्त रंगांच्या आयुष्यात हि काळरात्र पसरली!!
मन हे आतुर, वेडे फिरुनी लक्ष जाळी हि हवने!!२.!!
काळोखी जणू मनुचीया.....

रात्र दिव्यांची, दिन अंधारी तुटते रे आतडे!
गर्दीत जणू चिरडले रे दुखी-व्याधीत कातडे!!
पाषाणाच्या प्रेमापोटी खंडित हृदय अन मने!!३.!!
काळोखी जणू मनुचीया.....

संसाराचा हा रे पसारा क्षणभंगुर न वाटे!
दुख एकीचे वाटुनी सगळे शंका मनी का दाटे!!
विश्वासाचा धागा तोडूनी नाती न जोडणे!!४.!!
काळोखी जणू मनुचीया.....

कास लक्ष्मीची, आर्त भुकेची पापांची माऊली!
ओसाड पडती मग पुण्ये हि फोडती रे टाहोळी!!
अश्रूंच्या त्या हिंदोळ्यावर आटती हि स्पंदने!!५.!!
काळोखी जणू मनुचीया.....
-


हि अशी कशी कविता?? इतकं कसलं दु:ख होत तुला??

इतकं टोकाला जाण्यापूर्वी आमच्यापैकी कोणाचीच आठवण नाही झाली का रे तुला?? एकदाही??

सगळ्यांची दु:ख आणि प्रॉब्लेम्स वाटून घेतलेस ना रे तू?? मग तुला काही खुपत होत तर आम्हाला का नाही बोललास? तुझ्या मनातल मळभ... आम्हाला त्यापासून दूर का ठेवलंस? आम्ही तच मध्ये नव्हतो तुझ्या पूर्णवेळ.. कबूल आहे.. पण तू एक फोन केला असतास तर आम्ही नसतो का रे बोललो तुझ्याशी? नसत ऐकून घेतल तुझं?? मी तुझ्याशी हल्ली बोलले नव्हते.. कारण परीक्षेच्या गडबडीत शक्यच नाही झालं रे... त्याची एवढी मोठी शिक्षा देणार का रे तू तुझ्या लहान बहिणीला..??

मी बहिण ना तुझी? मग तुझी बहिण आज तुला गळ घालतेय.. जिथे असशील तिथून परत ये.. आमचे कान धरायला... पुन्हा एकदा गेट टुगेदर करायचं ना?? मी कोकण एक्स्प्रेस ची तिकीट काढतेय... सगळ्यांची.. या वेळी नक्की सगळे येतील.. अगदी सगळे.. कोणीही टांग देणार नाही.. शप्पत... तू म्हणशील तिथे जाऊ.. तू म्हणशील तिथे राहू.. फक्त एकदाच ये रे... एकदाच...

मी वाट बघतेय तुझ्या येण्याची.. येशील ना??
Powered by Blogger.

आम्हीं जगभर